26 November, 2016

रोख मुक्त गाव - कृती महत्वाची



ही कृती अत्यंत महत्वाची आहे. नोटबंदीने सगळा भारत ढवळून निघत असताना समाज माध्यमातही त्यावरच्या प्रतिकियांना बहर आला आहे. संसदेत विरोधकांनी कामकाज रोखून धरलं आहे. त्याना शेतकर्‍यांची पर्वा कधीच नव्हती आणि आजही नाही. ती असती तर त्यानीच मा. रणजित सावरकर यांनी केलेली कृती केली असती. DIGITAL INDIA या महत्वाच्या कार्यक्रमात ही हे पाऊल उल्लेखनीय आहे.  

मा. रणजित सावरकर
श्री. रणजित सावरकर यांच्या पुढाकाराने घसई होणार नोटबंदी नंतरचे भारतातील पहिले रोखमुक्त गाव. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी ठाणे जिल्ह्यातील मुरबाडच्या आदिवासी विभागातील धसई गावातील व्यवहार रोखमुक्त करण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे.  

नोटाबंदीनंतर निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती दूर करण्याच्या दृष्टीने रोखमुक्त व्यवहाराच्या दिशेने केंद्र सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अशाप्रकारे नोटबंदी नंतर रोखमुक्त होणारे घसई हे भारतातील पहिलेच गाव ठरणार आहे.

हे गाव १ डिसेंबर २०१६ पासून संपूर्णतः रोख मुक्त होत आहे. गावाची लोकसंख्या १०००० असून इथे जवळ पास १०० व्यावसायिक आहेत. आसपासची साधारण २५ खेडी व्यवहारांसाठी धसई वर अवलंबून आहेत. रोख मुक्तीचा लाभ धसाई आणि आजूबाजूच्या परिसरातील सुमारे पन्नास हजार लोकांना होणार असूनबँकेतून रोकड काढण्याच्या त्रासातून मुक्तता होईल. १०० पैकी सुमारे ३४ व्यापाऱ्यांचे कार्ड स्वाईप मशीन ३० नोव्हेंबर पर्यंत कार्व्यान्वित होत आहेत. अन्य व्यापारी ह्या मशीन्स घेण्याकरिता आवश्यक ती कारवाई पूर्ण करीत आहेत.

येथील प्रत्येक कुटुंबाकडे जन-धन खाते असून डेबिट कार्ड हि आहे. त्यामुळे १ डिसेंबर पासून ह्या भागातील लोक आपल्या सर्व गरजा करिता हे कार्ड वापरू शकतील अगदी वडापाव पाव पासून भाजी पाला , धान्यऔषधेखते आणि इतर सर्व गरजांसाठी डेबिटकार्ड वापरता येईल. हे कार्ड केशकर्तनालयेदवाखानेमोटार गॅरेजेस पासून अगदी शेती कामासाठी ट्रॅक्टर भाड्याने घेण्यासाठी डेबिट कार्ड वापरता येईल. थोडक्यातसांगायचे तर डेबिट कार्ड असलेया कोणालाही धसई गावात रोख रक्कम वापरण्याची गरज नाही. 

श्री रणजित सावरकर यांना या कामात धसई येथील धडाडीचे कार्यकर्ते श्री. कैलास घोलपश्री. अशोक घोलप आणि श्री. स्वप्नील पाटकर तसेच मुंबई येथील श्री पृथ्वीज माटे यांनी बहुमोल मदत केली. बँक ऑफ बडोदाचे महाप्रबंधक श्री नवतेज सिंग यांनी अत्यंत तत्त्परतेनेअल्प वेळात व्यापाऱ्यांची खाती उघडून त्यांना कार्ड स्वाईप मशीन देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले. उप-महाप्रबंधक श्री श्रीधर राव यांच्या नेतृत्वाखाली मुख्य प्रबंधक श्री. विजय सिंगश्री. कौस्तुभ शुक्ल आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे एक पथक यासाठी अखंडपणे कार्यरत होती.


याबाबत अधिक माहिती देताना रणजित सावरकर म्हणाले, "रोखी शिवाय व्यवहार असणारी अर्थव्यवस्था हे माझे स्वप्न होते. परंतु राज्यसभेत एका सन्माननीय सदस्याने केलेली एक टिप्पणी हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी लागणारी जिद्द निर्माण करण्यास कारणीभूत ठरली. “शेतकरी काय धोतरात डेबिट कार्ड घेऊन फिरतो काय?” हाच तो शेतकऱ्यांचा अपमान करणारा शेरा! आणि यास कोणीही प्रत्युत्तर दिले नाही. शेतकरी गरीब असतीलपण ते मूर्ख नाहीत. ते डेबिट कार्ड बाळगतात आणि वापरतात सुद्धा. पण फक्त ATM मध्ये. जर व्यापारी डेबिट कार्ड घेऊ लागले तरमग सर्व प्रश्नच संपेल. “रोख मुक्त धसई” केवळ एक सुरुवात आहे. धसई मोडेल ने हेच सिद्ध केले की “रोख मुक्त गाव” हे ध्येय साध्य करण्यासाठी लोक तयार आहेतबँका तयार आहेतव्यापारी तयार आहेतगरज आहे यांना एकत्रित आणण्याच्या दुव्याची ! तेव्हा सर्व जन प्रतिनिधींनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या दृष्टीने पुढाकार घ्यावा.

1 comment:

  1. Thanks for sharing, nice post! Post really provice useful information!

    Phục vụ cho nhu cầu vận chuyển hàng hóa bắc nam bằng đường sắt ngày càng lớn, dịch vụ vận chuyển ô tô bằng đường sắt và vận tải, gửi hàng hóa gửi xe máy bắc nam bằng tàu hỏa bằng đường sắt cũng đã xây dựng nên những qui trình, dịch vụ vận chuyển container lạnh bắc nam chuyên nghiệp và có hệ thống. Đảm bảo mang đến chất lượng tốt nhất cho khách hàng sử dụng dịch vụ.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates