11 September, 2014

यांचं काय झालं?








दरवेळी लडाखला जाताना एक दिवस श्रीनगरला रहायचो, मुख्यत: नगीन लेकच्या हाऊसबोट मध्ये. २००७ पासूनचा हा रिवाज या वर्षीही जुलै महिन्यात पाळता आला. आयबीएन लोकमतची टीम बरोबर असल्याने यावेळी आत्मा आणि मी एक दिवस लवकर श्रीनगरला गेलो होतो. आयबीएनची अमृता आणि कॅमेरामन रमेश सोबत होते तशाच रेणू दिदिही होत्या. नगीन लेकच्या संथ पाण्यातून निवांत गप्पा मारत फेरफटका मरला आणि संध्याकाळी हाऊस बोटमध्ये बसून श्रीनगरचं सौदर्य न्याहाळताना आयुष्यातले आनंदाचे अमुल्य क्षण अनुभवले.

त्याच श्रीनगरमध्ये आज हा हाकार उडाला आहे. अख्खं श्रीनगर पूराच्या पाण्याने वेढलं आहे. काही जीव गेले, उरलेले वाचण्यासाठी धडपड करीत आहेत.                      

त्या दिवशी तलावातल्या बदकाकडे बोट दाखवत रेणू दिदि म्हणाल्या होत्या “एकट्याने सगळ्या जीवनसंघर्षातून तरून जाण्याची निसर्गाची मूळ प्रवृत्ती आहे. ते बदक बघा एकटंच फिरतय.” तेव्हा कुठे माहित होतं की काही दिवसात हा संघर्ष आणखी तेव्र होणार ! निसर्गानेच एका प्रहारात दल लेक,  नगीन लेकची वाताहात करून टाकली. कुणालाच फोन लागत नाही, कशाचाच पत्ता नाही. तिथल्या हाऊस बोट, शिकारे यांचं काय झालं?



                       


3 comments:

  1. Atmaram Parab: Today I could connect to Muzafar for 2 min. They are fine but whole Nagin lake is shattered.

    ReplyDelete
  2. Atmaram Parab : Today I could connect to Sadiqbhai. Owner Hotel Siachen. His family is fine. No water blogging in his area but water reached upto Muzfar house 1st floor.

    ReplyDelete
  3. Amruta Durve · :
    You've written my thoughts! could you get in touch with any of them?

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates