18 October, 2013

हे इथेच घडू शकतं...!




फेसबुक वर हे छायाचित्रं पाहिलं आणि एकेकाळी कशाला आजही आपल्या देशातून सोन्याचा धूर आणि तुपाच्या नद्या वाहताहेत असं आपण म्हणू शकतो असं वाटायला लागलं. कुणा विजय (की पराजय) मल्हाने हे तुप ओतून आपल्या संपत्तीचं प्रदर्शन केलं असतं तर तो त्याचा माज आहे असं आपण म्हटलं असतं, पण आज सरकार अन्नसुरक्षा उपक्रम राबवून जिथे सत्तर टक्के लोकांना पोटभरण्याची हमी देवू पाहात आहे त्या पैकीच काही लोक पुण्य कमावण्यासाठी लाखो किलो तूपाची नदी वाहू देण्यात धन्यता मानतात याला काय म्हणायचं?

आमचं घरकाम करणारी बाई वर्षभर राब राब राबते आणि चतुर्थीच्या अकरा दिवसात कर्ज बाजारी होते. असं कर्जबाजारी होण्यात तीला धन्यता वाटते. तो आपल्याला वर्षभर देतो मग त्याला अकरा दिवसात काही कमी पडू नये म्हणून तीचा हा अट्टाहास असतो. न खाणार्‍या, पिणार्‍या आणि दिसणार्‍या देवाला असं उतू जाईपर्यंत दिलं म्हणजे मग आपली जन्माची दादात मिटेल असं जर आपण आजही मानत असू तर आणखी शेकडो नरेंद्र दाभोळकर कामी आले तरी आपण असेच वागत राहाणार. काय करायचं ? भक्ती आणि विकृती या मधलं अंतर नाहीसं झालं आहे.        

  

3 comments:

  1. jya deshache nagarik jase ahahet tasech tithale sarakar asate. hech khare ahe. mera bharat mahan mhananaryani jara vichar kela pahije.

    ReplyDelete
  2. jya deshache nagarik jase ahahet tasech tithale sarakar asate. hech khare ahe. mera bharat mahan mhananaryani jara vichar kela pahije.

    ReplyDelete
  3. dolas asnari andhshrdhaa....... ajun kay mahnayche

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates