13 January, 2013

कायदा आणि सुव्यवस्था सरकारलाच नको आहे का?




कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी वसंत ढोबळींची पुन्हा बदली झाली आहे. ज्या सांताकृझ  आणि पारले परिसरात त्यांची नियुक्ती होती त्या परिसरात गेले काही महिने आम्ही कायद्याच राज्य अनुभवत होतो. इथले लोकप्रतिनिधी आणि त्यांचे बगलबच्चे यांच्या अनिधिकृत कामांवर ढोबळेसाहेबांनी अंकूश बसवला होता. इतरवेळा परप्रांतीय फेरीवाल्यांनी व्यापलेले रस्ते ढोबळेसरांच्या काळात अचानक चालण्या योग्य झाले. दोन महिन्यांपुर्वी पारले कट्ट्या वर त्यांचे आश्वासक शब्द कानावर पडले आणि उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटाव्दारे  मनातल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

अनधिकृत काम रोखणे हे पोलीसांचं कर्तव्यच आहे, पण हे करणार्‍यावर जर, जे आज तुरूंगात पाहिजे होते त्यांच्या सांगण्यावरून कारवाई होत असेल तर........., तर आम्ही सामान्य नागरिकांनी जावं कुठं? दिल्लीत बलात्कार झाला, सारा देश हादरला, इथे मुंबईत हा कायदा आणि सुव्यवस्थेवरचा बलात्कार नव्हे का?          

2 comments:

  1. We are missing you sir Dhoble...
    please come back,other wise the U.Pians and Biharis are messing up Mumbai...

    ReplyDelete
  2. We are missing you sir Dhoble...
    please come back,other wise the U.P.ians and Biharis are messing up Mumbai...

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates