11 August, 2010

धीरे धीरे जींदगी की रप्तार तेज हो रही है।


कुठून सुरू करू? कसं सावरू?
गेले आठ-दहा दिवस मनाला शांती म्हणून नाही. माझा मित्र चेतन गेला त्यातून सावरतो न सावरतो तोच लेह लडाख मधली ढगफुटी झाली आणि पुन्हा हादरून गेलो. तिथे अजून चारशेच्यावर माणसं बेपत्ता आहेत. अतिशय विरळ लोकसंखेचा हा प्रांत, त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली म्हणजे आलेल्या प्रलयाची कल्पना येऊ शकते. निसर्गाशी दोन हात करत जगणारी तिथली मंडळी या आघातानंतरही पाच दिवसात कामाला लागलीत. आणखी जेमतेम एकच महिनाचा वेळ त्याना सावरायला मिळणार आहे. नंतर तिथला हिवाळा सुरू होत आहे.

तिथल्या कणाकणात, वातावरणात अध्यात्म भरून राहिलं आहे. लडाखला गेल्यावर आपल्याला त्याचा प्रत्यय येतो. आनंद हा तिथला स्थायीभाव आहे. बर्फाच्या पांढर्‍या रंगातूनही सप्त रंग निर्माण करण्याची कला ते लोक जाणून आहेत. कितीही कष्ट करायची त्यांची तयारी आहे. ढगफुटी नंतर गुंफेत आश्रयाला गेलेले लोक आता आपल्या घरांकडे परतत आहेत. लेह मनाली राष्ट्रीय महामार्ग छोट्या वाहनांसाठी सुरू करण्यात आला आहे. श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्ग अजून बंद आहे. नुकतीच नीमू ते लेह वाहतूक सुरू झाली आहे. दोन्ही बाजूची ट्रक वाहतूक लवकरार लवकर सुरू होवूदे. जेणे करून त्या भागातला पुरवठा पुन्हा सामान्य होईल. थोडक्यात, धीरे धीरे जींदगी की रप्तार तेज हो रही है।            


आपण प्रार्थनाच करू शकतो!.  

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates