10 April, 2010

गोष्ट छोटी पण खुपच मोठी


आत्ताच्या काळात व्यक्तीस्वातंत्र्याचा एवढा अतिरेक होताना दिसतो की घरातही लहान मुलांना बोलायची सोय उरलेली नाही. पालकांनी जरा कुठे रागवलं की काही बाबतीत असं होतं की मुलं सरळ आत्महत्या करतात. हे असं का घडतं? चांगले संस्कार व्हायला पाहिजेत तर छडी लागे छम् छम् चा जमाना गेला तरी मुलांनी स्वैर वागू नये म्हणून त्यांना काहीवेळा समज देणं आवश्यक असतच. जुने जाऊद्या म्हटलं तरी त्या जुन्या अनुभवांवरच आपलं पुढचं पाऊल पडत असतं. कुमारवयात पालकांनी केलेली कानऊघाडणी किंवा पालकांच्या वागणूकीचा मुलांना तेव्हा राग येत असला तरी पुढे आयुष्यात कधीतरी ते वागणं बरोबर होत हे ध्यानात येतं. हरिवंशराय बच्चन हे लेखक कवी म्हाणून आपणा सर्वांना माहित आहेतच पण ते कशाप्रकारचे पालक होते हे अमिताभ बच्चन शिवाय कोण चांगलं सांगू शकेल. हरिवंशराय बच्चन पाकल म्हणून तेव्हा तसे वागले म्हणूनच आजचा बिग बी पहायला मिळाला असं खुद्द अमिताबच म्हणतो. नुकताच लोकसत्तामध्ये एक लेख वाचनात आला. जरूर वाचा शिला..ध्यास!

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates