03 November, 2009

यांचा मला अभिमान वाटतो.


श्री.ज्ञानेश्वर मुळे, भारताचे मालदीवमधले उच्चायुक्त. दै. लोकसत्ता मधून बर्‍याच वेळा लिखाण करतात. माहितीपर आणि वाचनिय लेख असल्याने मी ते नेहमीच वाचतो. गेल्याच रविवारी उच्चायुक्त करतात तरी काय? : बदलते विश्व बदलता भारत त्या आधी मालदीव : असेही गोड आतंकवादी! बदलता भारत बदलते विश्व असे लेख लोकसत्ताच्या वाचकांनी वाचले असतीलच. एवढ्यामोठ्या पदावर असताना श्री.ज्ञानेश्वर मुळे यांना सामान्य वाचकांसाठी काही लिहावेसे वाटते हेच खुप आहे. त्या पलिकडे जावून ते जेव्हा आपल्या नित्य कामाच्या बाबतीतले अनुभव लिहीतात तेव्हा खरच अचंबीत व्हायला होतं. मालदीवला साखरेचा तुटवडा पडू नये म्हणून केलेले प्रयत्न किंवा ताज हॉटेलच्या उद्घाटनाला मालदीवचे राट्राध्यक्ष आणि मा. रतन टाटा यांची घडवून आणलेली भेट अशा प्रकारच्या गोष्टीमधून त्यांची काम करायची पद्धत दिसून येते. राजदूत किंवा उच्चायुक्त हे दोन देशातला एक नाजूक दुवा असतो. दुसरा देश मग तो कोणताही असूदे पण आपल्या देशाशी त्या देशाचे संबंध चांगलेच असले पाहीजेत. ते संबंध सुधारणं बर्‍याच अंशी या उच्चायुक्तांवर अवलंबून असतं. आणखी एक गोष्ट परदेशात असलेल्या भारतीय नागरीकाना आपल्या देशाच्या उच्चायुक्तांचा मोठा आधार असतो. अनेकदा परदेशात गेल्यावर पासपोर्ट हरवणे, संकटाची परिस्थिती निर्माण झाल्याने त्वरीत मायदेशी निघून येणे अशा प्रसंगी आपल्या वकिलातीचाच सहारा घ्यावा लागतो. ज्ञानेश्वर मुळे सारखे अधिकारी असले की या गोष्टी सोप्या होतात अन्यथा... परदेशात असलेल्या आपल्य लोकांना याचा जास्त अनुभव असेलच. आपलं काम चांगल्या प्रकारे करणं, भारतीयांना देलासा देणं, देशाच्या हिताचा सतत विचार करणं, काही वेळा वाट वाकडी करूनही मादतीचा हात पुढे करणं या गोष्टी केल्या मुळे आणि सोनेरी पिंजर्‍यात न रहाता सामान्यांच्या जवळ जाण्याने मुळेसाहेब तुमचा मला अभिमान वाटतो.


6 comments:

  1. aapan loksttat ek patra hi lihile ahe na Narendra Prabhu navane.. satysaibaba@warsha- cm's home; politician lokanchi bhondugiri ashya sandarbhat?

    ReplyDelete
  2. Yog, लोकसत्ता मधलं पत्र मझच आहे.

    ReplyDelete
  3. atishay parakhadpane lihile ahe..
    ashi patra kharach jag halawatil yat shanka nahi.

    ReplyDelete
  4. Appasaheb Pant was one such legendary diplomat. His father was the ruler of Aundh, who carried out the experiment of trying to reform criminals by reposing trust in them and challenging them to reciprocate the faith. The experiment was originally carried out in Scandinavia, and the king of Aundh read about it and tried it himself. Ga Di Madgulkar wrote a story about it which was the basis of 'Do Aankhe Baarah Haath'. When GaDiMa won a prize for the film's script, Appasaheb Pant wrote him a letter. GDM has written about it somewhere, probably in 'mantaralele divas'. GDM has also written in glowing terms about Appasaheb Pant's father as an ideal king who was like a father unto his subjects.

    Appasaheb Pant represented India in a few countries, and was famous for mixing with the locals, and helping visiting Indians. M V Kamath had written an article on Pant 20-25 years ago, praising him as one of the finest diplomats from Nehru's years.

    - dn

    ReplyDelete
  5. Yog, राज्यावर आपलासुद्धा अधिकारा आहे. हे निर्ढावलेले राजकारणी लोकशाहीचं तेरावं घालूनही कामावार यायला तयार नाहीत.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates