01 November, 2009

निर्लज्ज राजकारणी आणि जनतेच्या पैशाचा अपव्यय


निवडणूकीचा निकाल लागून आठ दिवस होवून गेले तरी महाराष्ट्रात सरकार स्थापन होत नाही. आधी मुख्यमंत्री कोण?, मग उपमुख्यमंत्री कोण? मग कोणाचे किती मंत्री, आता कोण कोण मंत्री या सगळ्या ठासमारीत सरकारचं घोंगडं भिजत पडलय. तिकडे राजभवनावर मंडप सजवून चार दिवस झाले. उन्हाने खुर्च्या गरम होवून पुन्हा थंड झाल्या पण राजकारण्यांपैकी कुणी तिकडे त्या गरम करायला फिरकलेला नाही. रोज दिड लाख रुपये एवढं मंडपाचं भाडं भरलं जात आहे. हा पैसा कुणाचा?

तिकडे ज्याना मंत्रीपदाची आशा नाही अशा आमदारांनी आमदार निवासातल्या सागराभिमुख खोल्यांची कुलूपं परस्पर फोडून त्यात घुसखोरी केली आहे. या घुसखोरांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकीच रद्द केली पाहीजे. हे प्रतिनिधी पुढची पाच वर्ष कशा प्रकारचा कारभार करणार त्याची ही झलकच आहे.


No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates