05 April, 2009

पहिले ते राजकारण

जात-पात, वर्ग, वर्णभेद, नाती-गोती आणि घराणेशाही पासून पैसा, कटकारस्थाने, गुन्हेगारी आणि लोकशाही मुल्यांची पायमल्ली हे करताना आता कोणत्याही राजकीय पक्षाला जनाची आणि मनाची लाज म्हणून राहिलेली नाही. निलाजरेपणा आणि नाटक म्हणून सध्याच्या निवडणूकांकडे पाहिलं तर मनोरंजन मात्र होईल. सरड्याला मागे टाकत आपले रंग आणि अभिनिवेश बदलण्याची कला राजकारण्यांनी दाखवायला सुरवात केली आहे. सगळ्यांचं ' एकच लक्ष सत्ता पक्ष ' असं झालय, त्यामुळे तत्वांना तिलांजली हे आलच. तेव्हा उमेदवार पाहून त्याला मतदान करावं, पक्ष पाहून नको. आपण सुध्दा पक्षाचं जोखड फेकून द्यायला शिकलं पाहीजे. निदान चांगला माणूस निवडल्याचं समाधान मिळेल

नरेन्द्र प्रभू 

2 comments:

  1. योग्य तेच लिहीले आहे. बस झाले हे प्रस्थापीत स्वार्थी राजकारणी

    ReplyDelete
  2. आभारी हरेकृष्णाजी

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates