21 December, 2008

जायचय गोठलेल्या लडाखला ?

नुकतेच मुंबईवर झालेले अतिरेकी हल्ले आपल्या शूर जवानांनी परतवून लावले ते आपण दुरदर्शन वरून पाहीले. जवान सिमेवर असतात म्हणून आपण इथे सुरक्षीत आहोत म्हणता म्हणता शत्रू प्रत्यक्ष घरातच शिरला, त्याचा खातमा आपल्या विरांनी केला. तमाम भारतवासीयांना अभिमानास्पद अशीही गोष्ट. आपले जवान प्रत्यक्ष सिमेवर असेच शत्रूशी लढतात, पण निसर्गानेही उभा दावा मांडलेला असेल तर त्यांना दोन आघाड्यांवर लढावे लागते.

अंटार्टीकाचे सर्वानाच कोण कौतुक ! तीथलं हवामान, तीथलं बर्फ, वारे सगळच काही और. आपल्या भारतात सुद्धा त्याहून विषम परिस्थीती आनुभवायला मिळते ती जम्मु-काश्मीरच्या लडाख विभागात. कारगील युद्ध ज्या भागात लढलं गेलं त्या द्रास-बटालीक क्षेत्रात सन २००५ मध्ये जगातील सर्वात कमी -६० ( वजा साठ ) अंश तपमान नोंदलं गेलं. लेहला नोहेंबरमध्ये दिवसा ३ ते ४ अंश तर रात्री - ७ ते - ८ अंश असलेलं तपमान फेब्रुवारीत रात्रीचं -१० ते - ४० एवढं खाली घसरतंकसं असेल हे गोठलेलं लडाख ? काटा आला ना अंगावर ? जायचय गोठलेल्या लडाखला ? झंस्कारच्या स्तब्ध झालेल्या प्रवाहावरून चालायचय ? आम्ही पण तुमच्याशी हितगुज करायला आलोय असं तीथे जाऊन आपल्या जवानांना आश्वस्थ करायचय ? निसर्गाचा एक अविस्मरणीय चमत्कार पहायला चला तर मग याच हिवाळ्यात. आपल्यासारख्या जिप्सींसाठी गेली १३-१४ वर्षे सातत्याने लडखवारी करणारे श्री. आत्माराम परब या वर्षी आपणाला ही संधी उपलब्ध करून देत आहेत. अधिक माहितीसाठी ९८९२१८२६५५ / ९३२००३१९१० वर संपर्क साधावा.

नरेन्द्र प्रभू



1 comment:

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates